अमरावतीत शाळेची भिंत कोसळली; विद्यार्थ्याचा मृत्यू

0

अमरावती : जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील आष्टी गावात शाळेची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत.

भातकुली तालुक्यातील आष्टी येथे मणिबाई छगनलाल देसाई विद्यालय आहे. या विद्यालयाची भिंत दुपारी एकच्या सुमारास कोसळली. यात वैभव गावंडे (वय १३) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तो इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. मणिबाई देसाई विद्यालयाची इमारत जुनी असल्याचे सांगितले जात असून जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने आष्टी येथे तणावाचे वातावरण पसरले आहे. आष्टी येथे आजूबाजूच्या गावांमधून अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. जखमी विद्यार्थ्यांपैकी दोघे जण देवरी आणि अनकवाडी येथील आहेत.