पुणे-भाजपने निवडणूक काळात धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर येऊन ४ वर्षे उलटली मात्र अद्याप आरक्षणाबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. सरकारची धनगर समाजाला अनुसुचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्याची मानसिकता नसल्याचे मागील चार वर्षांच्या काळातील कारभारातून दिसत आहे. त्यामुळे धनगर समाजाने तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेतला असून त्याला आजपासूनच सुरुवात होणार असल्याचे धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले.
या लढ्यादरम्यान कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी माजीमंत्री अण्णा डांगे, आमदार रामहरी रूपनवर, राम वडकुते, दत्ता भरणे, पुणे जिल्हापरिषद अध्यक्ष विश्वास देवकते यांच्यासह राज्यभरातील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.