आरक्षण नसल्याने मुस्लिम समाज शिक्षणापासून वंचित- आशिष देशमुख

0

नागपूर: मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, की मुस्लिम समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे मुस्लिम समाज चांगले शिक्षण घेण्यापासून वंचित राहिला आहे.

मुस्लिम समाजाला आरक्षणाची त्वरित गरज असून नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळाले तर तो समाज आपली प्रगती करेल. मागील राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) सरकारने ऑक्टोबर २०१४ मध्ये एक नोटीस जारी केली होती, त्यात ५ टक्के कोटा मुस्लीम समाजाच्या नोकरी आणि शिक्षणासाठी ठेवण्यात आला होता. तसेच मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती.

मुस्लीम समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगती होणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मुस्लीम समाजाला त्वरित आरक्षण द्यावे.