गरम पाण्याने जलाभिषेक करून घेतले दर्शन
आळंदी : श्रींचे 723 व्या संजीवन समाधी सोहळ्यानंतर प्रथा परंपरांचे पालन करीत श्रींच्या संजीवन समाधीला प्रक्षाळ पुजा करण्यात आली. समाधीला भाविकांकडून जलाभिषेक करण्यात आला. प्रक्षाळ पुजेस भाविकांनी श्रींच्या दर्शनास गरम पाण्याने जलाभिषेक करीत लिंबू, साखर, मध लावून प्रक्षाळ पुजेत श्रींचे दर्शन घेतले. आळंदी परिसरातून भाविकांनी श्रीचे दर्शनास मंदिरात गर्दी केली. आळंदी कार्तिकी महायात्रे नंतर प्रक्षाळ पुजेस भाविकांची दर्शन व्यवस्था, भाविकांना जलाभिषेकास मंदिरात गरम पाणी देखील उपलब्ध करून वाटपास देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संजय रणदिवे, श्रीधर सरनाईक, बाळासाहेब चोपदार, श्रींचे पुजारी राहुल जोशी, राजाभाऊ चौधरी, सेवक, मानकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा
पवमान अभिषेक पुजा
कार्तिकी यात्रा झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर लिंबू, गरम पाणी, साखर, मध, अत्तर लावून भाविक संजीवन समाधीवर प्रक्षाळ पुजा केली. यामध्ये जलाभिषेक करून श्रींचे दर्शन घेतात. कार्तिकी सोहळ्यानंतर मंदिरातील प्रथा, परंपरेने होणार्या कार्यक्रमात प्रक्षाळ पूजेचे विशेष महत्त्व आहे. शुक्रवारी भाविकांनी श्रींच्या संजीवन समाधीवर जलाभिषेकास गर्दी केली होती. माऊली मंदिरात धार्मिक कार्यक्रमात श्रीचा पवमान अभिषेक पूजा प्रमुख विश्वस्त अॅड.विकास ढगे पाटील यांचे हस्ते झाली. यावेळी श्रींचे क्षेत्रोपाद्ये राहुल जोशी यांनी पौरोहित्य केले. परंपरेने श्रींना महानैवेद्य, विणा मंडपात नित्य नैमित्तिक प्रवचन सेवेस सुरुवात करण्यात आली. कारंजा मंडपात भजन सेवा, धुपारती, गावकरी भजन झाल्यानंतर परंपरेने काठयाचा महाप्रसाद वाटपाने प्रक्षाळ पूजेची सांगता परंपरेने होते, असे मंदिराचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.