‘कमवा आणि शिका’चा दूत अंथरुणात

0

मुंबई । सोलापूर जिल्ह्यात चहा विकून सी.ए बनलेला सोमनाथ गिरामवर झाला होता. त्याच्या यशाची व मेहनतीची नोद महाराष्ट्र सरकारने घेतली. त्याला राज्य सरकारच्या ‘कमवा आणि शिका’ या योजनेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनविले.मात्र एक अपघात झाला. त्याचा कमरे खालचा भाग अर्धांगवायूचा झटका आल्याने निकामी झाला. तो आज अंथरूणाला खिळून आहे. त्याच्याजवळ उपचारासाठी पैसे नसल्याने उपचार होणार की नाही ? सरकारने उपचाराची जबाबदारी घेतल्याचे सागु शासन नेहमीप्रमाणे विसरून गेले आहे.अद्याप त्याच्याकडे पाहायला कोणत्याही सरकारी अधिकारी आणि विनोद तावडेंनाही वेळ मिळाला नाही. त्यामुळे त्याच्यावर एकप्रकारे उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

2016 ला ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त
सोलापूर जिल्ह्यात चहा विकून सी.ए. बनलेला सोमनाथ गिरामवर.वास्तविक, सोमनाथनं चहा विकून स्वत: चं आयुष्य घडवलं. कठोर परिश्रम घेऊन, सीएची परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. त्याच्या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक सुरु होते. त्याच्या यशाला अजून बळ दिलं, ते राज्य सरकारच्या ‘कमवा आणि शिका!’ या योजनेनं.महाराष्ट्र सरकार तर्फे 2016 मध्ये सोमनाथला ‘कमवा आणि शिका!’ या योजनेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले. विनोद तावडे यांनी त्याच्या नावाची घोषणा अतिशय थाटामाटात केली.लहानपणापासून गरिबीत दिवस काढलेल्या सोमनाथचे चांगले दिवस सुरु होते. पण 8 सप्टेंबर 2016 मध्ये त्याचा सोलापूरमध्ये अपघात झाला, आणि त्याचे आयुष्यच बदलले.या अपघातात त्याच्या कमरे खालच्या भागाला अर्धांगवायूचा झटका आल्याने निकामी झाला.

उपचारांसाठी महिना 35 हजारांची गरज
आयुष्य सध्या नैराश्येच्या गर्तेत सापडलं आहे. या अजारामुळे तो अक्षरश: अंथरुणाला खिळून आहे.एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या तरुणाला सध्या उपचारांसाठी महिना 35 हजारांची गरज आहे. सोमनाथच्या अपघातानंतर त्याच्या उपचाराची सर्व जबाबदारी राज्य सरकार करेल, असं अश्वासन दिलं होतं. पण उपचारासाठी त्याला अजूनपर्यंत एकही रुपया मिळाला नसल्याचे तो सांगतो.त्याच्यावर उपचारासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. पण त्यातून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न कसा सुटणार? या एकाच प्रश्नाने सोमनाथला ग्रासले आहे.राज्य सरकारने मदतीचे जे आश्वासन दिले, ते नोकरीच्या स्वरुपात पूर्ण करावे अशी त्याची अपेक्षा आहे.