खिर्डी शाळेत विद्यार्थ्यांना तांदूळ, कडधान्याचे वाटप

0

खिर्डी : जि.प.उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना तांदूळ व विविध प्रकारच्या दाळी वाटप करण्यात आल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे़ यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय पोषण आहार योजना सुरू असलेल्या विविध शाळांमध्ये पडून असलेला दाळ- तांदूळाचा साठा शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते. देशात कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी साथ रोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत 15 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन आहे़ दरम्यान सर्वोच्च न्यायालयात सुमोटो रीरट याचिकेद्वारे विविध शाळांमध्ये पडून असलेले धान्य आणि इतर साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्याची मागणी करण्यात आली आहे़ यानुसार शासनाने शालेय पोषण आहार योजनेचे तांदूळ व डाळी हे साहित्य वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच येथील शाळेत ग्रामस्थांना रांगेत उभे करून त्यांच्यामध्ये एक मीटर अंतर ठेऊन त्यांना तांदूळ व दाळी वाटप करण्यात आले.या वेळी खिर्दू बुद्रुक सरपंच किरण कोळी, माजी पोलिस पाटील अरुण पाटील ,जयंत पाटील ,प्राथमिक विद्यामंदिर खिर्डीचे मुख्याध्यापिका स्वाती झोपे, सुषमा सूरदास, कुंदा पाटील, अविनाश फासे, रुपाली चौधरी, युवराज सपकाळे, गौरव पाटील, उर्दू शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आसीफ बेग, शेख अस्लम, किरण नेमाडे, गंभीर पाटील, नईम बेग, शेख कय्युम, शेख इम्रान, फिरोज खान, शेख इरफान तसेच उर्दू शाळेतील मुख्याध्यापक आदिल खान, अनिस खान, जावेद खान, माजीद खान, एजाज अहेमद, शेख इद्रीस आदींची उपस्थिती होती.