पवार-ठाकरे आघाडी, भाजपच्या अडचणी वाढल्या
पिंपरी : येणार्या निवडणुकीत राज्यात घडयाळ्याच्या अचूक ठेक्यावर मनसेचे इंजिन धावणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी शरद पवार यांनी राज ठाकरे यांनी देखील कानमंत्र दिला आहे. राज ठाकरे देखील शरद पवार यांच्या बरोबर जाण्यास उत्सुक असून याला फक्त काही प्रमाणात काँग्रेस आयचाच अडसर निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे राज्यात आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटने बरोबरच शेतकरी कामगार पक्ष व मनसे अशी नवी आघाडी तयार होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तवली आहे. यामुळे युतीच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नुकताच राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील पराभवामुळे भाजप देशात बॅक फुटवर गेली आहे. त्यामुळे आता शरद पवार यांनी राज ठाकरे यांना आपल्या तंबुत घेतल्याने शिवसेना व भाजप यांच्यात कमालीची अस्वस्थता वाढली आहे. यामुळे येणार्या निवडणुकीत ही आघाडी निश्चितच ऱंग भरेल यात शंका नाही.
हे देखील वाचा
महत्वाचे जिल्ह्यांना भेटी
नुकताच पुण्यात शरद पवार व राज ठाकरे यांची भेट झाली. यामध्ये शरद पवार यांनी आपल्या राजकीय अनुभवाच्या चांदण्याचा पाऊस पाडत राज यांना आपल्या बाजूने वळवण्यात यश आल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांनी जर राष्ट्र्वादीला साथ दिली तर ठाकरे यांना मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे व ठाणे परिसरातील विधानसभेच्या व लोकसभेच्या काही जागा सोडण्यात येणार आहेत. यामध्ये पुण्यातील खडकवासला, कोथरुड, हडपसर व जुन्नरच्या जागेचा देखील समावेश आहे. तर शिरुर लोकसभेच्या जागेचा देखील समावेश असण्याची शक्यता आहे. कारण मनसेकडून मंगलदास बांदल विद्यमान खासदार आढळराव पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरण्यास तयार आहेत. तशी इच्छा देखील बांदल यांनी राज ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवली आहे. या समीकरणांच्या धर्तीवरच सध्या राज ठाकरे यांनी राज्यातील महत्वाचे जिल्ह्यांना भेटी देण्यास सुरवात केली आहे. याला नागरीकांचा देखील प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. मनसे राष्ट्रवादीत गेला तर राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटऩा, शेतकरी कामगार पक्ष अशी नविन आघाडी राज्यात प्रथमच होणार आहे. पन मनसेच्या प्रवेशाने काँग्रेसच्या पोटात मात्र गोळा येण्याची शक्यता आहे. मात्र या आघाडीबाबत अद्यापही कोणतीच घोषणा दोन्ही पक्षांकडून करण्यात आली नसली तरी असा काही निर्णय झाल्यास नवल वाटणार ऩाही.
मनसेला हव्यात 35 जागा
या आघाडीत सामिल होण्यासाठी मनसेला विधानसभेच्या 35 जागा तर विधानसभेच्या 5 जागा हाव्या आहेत. पण मनसेची ताकद पाहता मनसेला 25 ते 30 जागा मिळू शकतात. यामध्ये सर्वात जास्त मुंबईंतील जागांचा समावेश असेल. कारण चाणाक्ष शरद पवार यांनी मुंबई व आसपासच्या शहरी भागात राष्ट्रवादीचा कमी असलेला प्रभाव व मनसेची ताकद याची गोळाबेरीज केल्यास विधानसभेच्या 60 व लोकसभेच्या 8 जागेवर युतीला अडचणीत आणु शकु याची अटकल पुर्वीच बांधली आहे. यामुळे शिवसेने बरोबरच भाजप देखील येणा-या निवडणुकीत मोठ्या कोंढीत सापडू शकतो हे मात्र नक्की.