चांगल्या वातावरणात राम मंदिराची उभारणी झाली पाहिजे – राजनाथ सिंह

0

नवी दिल्ली : राम मंदिराचे प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही राम मंदिराच्या उभारणीवरुन राजकीय विधाने होताना दिसत आहेत. राम मंदिर बांधले तर सर्वांनाच आनंद होईल,आमच्या मते एका चांगल्या वातावरणात राम मंदिराची झाली पाहिजे.असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हंटले आहे. दरम्यान, अध्यादेशाच्या माध्यमातून रामजन्मभूमी येथे मंदिर उभा करण्यासाठी हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत.

मंगळवारी हिंदू संघटनांनी राम मंदिर निर्मितीसाठी १ ते ६ डिसेंबरपर्यंत महायज्ञ करण्यात येणार आहे असे जाहीर केले आहे. देशभरातील संत मोठ्यासंख्येने यज्ञ करण्यासाठी अयोध्येत येतील, असे दिल्लीतील विश्व वेदांत संस्थेने म्हटले आहे. तर दुसरीकडे मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी मोठे वक्तव्य केले. राम मंदिराच्या निर्मितीसाठी सरकारने लोकसभेत विधेयक आणले पाहिजे. ते विधेयकाच्या माध्यमातून हे प्रकरण संपवले पाहिजे. सरकारने जर कायदा बनवला तर आमची हरकत नसेल. आम्ही एकट्याने कायदा रोखू शकत नाही.