पत्रकार, नागरिकांनी केली मदत; शेतकर्यांची चिंता वाढली
चाळीसगाव । कांद्याने आगोदरच शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे तब्बल 3 हाजाराने कमी भाव कांद्याला मिळत आहे त्यातच शुक्रवारी दुपारच्या सुमारास येथील तहसील कार्यालयासमोर रस्त्यावर कांद्याच्या ट्रॅक्टरचे फाळके अचानक उघडल्याने कांदा रस्त्यावर पडला होता जवळच उभे असलेल्या नागरीक व पत्रकारांनी मदतीला धावून हा कांदा ट्रॅक्टर मध्ये भरला. यामुळे शेतकर्याला दिलासा मिळाला.
ट्रॅक्टरचे मागचे दार अचानक उघडले
शुक्रवारी दुपारच्या सुमारास शेतकरी दोन ट्रॅक्टर भरुन कांदा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना तहसील कार्यालयासमोर विरसावरकर चौकात हॉटेल आर्योपहार समोर दुपारी अचानक ट्रॅक्टरचे मागील दार उघडले त्यामुळे कांदा रस्त्यावर पडला. त्यावेळी वृत्तसंकलन करण्यासाठी तहसील आवारात उभे असलेले पत्रकार मोतीलाल अहिरे, सुनिल राजपुत, सूर्यकांत कदम, गणेश पवार, दिलीप घोरपडे, अर्जुन परदेशी, रामलाल चौधरी, मनोहर कांडेकर, मंगेश शर्मा, अशोक महाले, गणेश पाटील, नारायण परदेशी यांनी व नागरीकांनी रस्त्यावर पडलेला कांदा काही वेळातच ट्रॅक्टर मध्ये भरुन टाकला. मागील दोन महिन्यापूर्वी कांद्याला चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारात 3800 रुपये क्विंटल ईतका भाव मिळाला होता मात्र आता आज दिनांक 6 एप्रील रोजी कांद्याला चक्क 775 रुपये एवढा कमी भाव मिळाला असुन तब्बल 3000 हजाराने कमी भाव मिळत असल्याने शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. आमच्या उत्पादनाचा खर्च देखील काही वेळा निघत नसल्याचे शेतकर्यांनी बोलुन दाखवले आहे.