जळगाव : 30 वर्षीय तरुणाने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शहरातील नाथवाडी भागात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राहुल विजय चौरसिया (30, नाथवाडा, सिंधी कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
राहुल चौरसिया हा तरुण आई व लहान भाऊ यांच्यासह वास्तव्यास होता. राहुलचे नवीन बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या भज्जे गल्ली फळ विक्रीचे दुकान होते व त्यातून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. शनिवार, 5 मार्च रोजी रात्री राहूल जेवण करून झोपला असताना त्याने मध्यरात्रीच गळफास घेतला. हा प्रकार त्याचा भाऊ हर्षल यांच्या लक्षात आल्यानंतर घटना उघडकीस आली. त्याला तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निळकंठ महाजन यांनी मयत घोषीत केले. रविवारी सकाळी 11 वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस कर्मचारी सचिन मुढे व शांताराम पाटील करीत आहे. मयताच्या पश्चात आई किरण व भाऊ हर्षल असा परीवार आहे.