माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना यश
भुसावळ- जिल्ह्यातील सुमारे 25 हजार शेतकर्यांनी पीक विमा काढला होता तर त्यातील 22 हजार शेतकर्यांना राज्य सरकारकडून हिस्सा मिळालेला होता परंतु केंद्र सरकारकडील नुकसान भरपाईच्या हिश्याची रक्कम मिळाली नसल्याने गत आठवड्यात सुमारे 250 शेतकर्यांनी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांनी भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन दिले होते. खासदार खडसे यांनी केंद्र सरकारच्या अधिकार्यांशी चर्चा करून नुकसानभरपाईची रक्कम तत्काळ मिळण्यासंदर्भात भूमिका मांडली. केंद्र सरकारने त्याची दखल घेत शेतकर्यांच्या नुकसान भरपाईपोटी रक्कम विमा कंपन्याना वर्ग केली. सोमवारपासून शेतकर्यांना विमा कंपन्या कडून केंद्र सरकारच्या हिश्याची नुकसानभरपाई ची रक्कम मिळणार आहे.
त्या शेतकर्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर भरपाई
तीन हजार शेतकर्यांपैकी काहींचे बँक खाते क्रमांक बदलले आहे शिवाय चुकीचा खाते क्रमांक दिल्यामुळे ते नुकसान भरपाईपासून वंचित राहिले असल्याने अशांना नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपनी बँकेकडे वर्ग करणार आहेत. त्या शेतकर्यांना त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर नुकसान भरपाई मिळणार आहे. गत जून महिन्यात माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या समेवत शिष्टमंडळाने केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेत नुकसान भरपाईची मागणी केली होती.