धुळे। गेल्यावर्षी शेतकर्यांना मंजूर झालेल्या पीक व फळ पीक विम्यापोटी 25 कोटी रुपयांचे अनुदान शेतकर्यांनाच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. सुमारे 35 हजार शेतकर्यांना पीक विमा फळपीक विमा मंजूर झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी दिली. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजना 2016-17 च्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राज्य शासनाने जिल्ह्यात ही योजना लागू केली होती. कर्जदार शेतक:यांना सक्तीची तर कर्ज न घेण्याची शेतकर्यांना ऐच्छिक स्वरूपाची होती. जिल्ह्यातील 33 हजार 773 शेतकर्यांना पीक विम्याचे 18 कोटी 90 लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत.
बँकेत शहानिशा करण्याचे आवाहन
ज्या महसूल मंडळात पीकनिहाय विमा मंजूर झालेला आहे, अशा शेतकर्यांनी ज्या बॅँकेच्या शाखांमध्ये या पीक विमा योजनेचा हप्ता भरला होता, त्या बॅँकेकडे जाऊन शेतकर्यांनी आपल्या खात्यात रक्कम जमा झाल्याची खात्री करावी. धुळे तालुका 6 कोटी 23 लाख, साक्री 3 कोटी 90 लाख,शिंदखेडा 8 कोटी 47 लाख व शिरपूर तालुका 30 लाख रुपये, अशी तालुकानिहाय पीक विम्याची रक्कम आहे. जिल्ह्यात गतवर्षी हवामान आधारित फळ पीक विमा योजना डाळिंब पिकासाठी लागू करण्यात आली होती. जिल्ह्यातील 1 हजार 142 शेतकार्यांनी त्यात सहभागी होऊन हप्ता भरला होता. या सर्व शेतकर्यांना 5 कोटी 89 लाख रुपये फळ पीक विम्यापोटी मंजूर झाले आहेत.