सस्थानकावर चालकांकडून घेतली जात नाही दक्षता
पीएमपीएमएल बसमधून प्रवास करणे धोकादायक
हे देखील वाचा
पिंपरी : अगोदरच वादात सापडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएस मार्गावरील पीएमपीएमएल बसमधून प्रवास करणे धोकादायक बनत चालले आहे. बसस्थानकावर चालकांकडून दक्षात घेतली जात नाही. दरवाजे उघडे असतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत नाही. मार्गातच बंद बस पडतात. काही वेळा तर प्रवाशी बीआरटी थांब्यावर तर बस सेवा रस्त्याने धावत असतात. त्यामुळे प्रवाशांना कोणत्या थांब्यावर थांबावे, असा प्रश्न पडतो. यामुळे दापोडी-निगडी हा बीआरटीएस मार्ग म्हणजे एक अडथळ्यांची शर्यत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांकडून दिल्या जात आहेत.
दापोडी ते निगडी हा बीआरटीएस मार्ग आठ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर 24 ऑगस्टपासून सुरु झाला आहे. 12.5 किलो मीटर लांबीचा हा मार्ग आहे. या मार्गावर एकुण 36 बस थांबे उभारण्यात आले आहेत. बीआरटीएस बससाठी 3.50 मीटर रुंदीची स्वतंत्र मार्गिका बाधंण्यात आली आहे. या रस्त्यावर मध्यभागी असून विविध ठिकाणी आठ चौक, पाच ठिकाणी सब-वे, 21 मर्ज इन, मर्ज आऊट तसेच चौकांचे ठिकाणी, मर्ज इन, मर्ज आऊट या ठिकाणी पादचारी व वाहतुकीचे सुरक्षिततेचे दृष्टीने आयआयटी मुंबई यांनी सुचविल्याप्रमाणे, वाहतूक नियंत्रण दिवे, पादचारी मार्ग, झेब्रा मार्किंग तसेच विविध माहिती दर्शक सुचना फलक बसविण्यात आलेले आहेत. तथापि, पीएमपीएमएल बस चालकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचा दिसून येत आहे.
बीआरटी बसचे दरवाजे उघडे असतात. स्थानकावर बस प्रवासी चढू आणि उतरेपर्यंत देखील बस थांबत नाही. बस थांबा आल्यानंतर अनेक बसेसमध्ये उद्घोषणाही होत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांना कोणता थांबा आला हे लक्षात येत नाही. दरवाज्यांची दुरवस्था आहे. एखादा प्रवासी बस स्थानकाच्या दरवाज्यामध्ये अडकून जायबंदी होण्याची भिती आहे. चालकांकडून सिग्नलचे पालन केले जात नाही. पीएमएमपीएलने नियुक्त केलेले वॉर्डन देखील जागेवर नसतात. बीआरटीएस मार्गातून अनेक खासगी वाहने धावतात. त्यामुळे बीआरटी मार्ग की सेवा रस्ता आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याला वॉर्डनकडून प्रतिबंध केला जात नाही. त्यातच मार्गात बीआरटी बस बंद पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. बंद पडलेली बस बाहेर काढण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. गेल्या आठवड्यात बीआरटी मार्गात दोन-तीन वेळा बस बंद पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागता होता. एकदंरीतच दापोडी- निगडी या मार्गावरील बीआरटीतून प्रवास करावा लागणे म्हणजे मोठे संकट पार करावे लागण्यासारखे असल्याचे, प्रवासी बोलत आहेत.