दारिद्य्र रेषेखालील शेतकर्‍यांचे जीवनमान उंचविण्यासाठी अर्थसहाय्य

0

नवापूर । येथील पंचायत समितीच्या वतीने कृषी विभागामार्फत आदिवासी उपयोजना अंतर्गत दारिद्र रेषेखालील शेतकर्‍यांना त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने अर्थसाह्य योजने अंतर्गत संबंधित शेतकर्‍यांना शेती सुधार व उत्पन्नवाढी करिता विविध प्रकारच्या 13 बाबी करिता 50हजार रु पर्यत मदत करण्यात येते. याबाबतचा कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेतकर्‍यांना विविध साहित्याचे वाटप जि.प अध्यक्षा रजनी नाईक व पं.स सभापती सविता गावीत यांचा हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपसभापती दिलीप गावीत, जि.प सदस्या मायावती गावीत,जि.प सदस्य रतन गावीत,पं.स सदस्य जालमसिंग गावीत,विजय गावीत,सरपंच बाबल्या गावीत,सुमन गावीत,प्रभु कोकणी,आदी उपस्थित होते.

शेती अवजारे, बैलगाड्यांसाठी अनुदान
यावेळी जि.प. अध्यक्षा रजनी नाईक यांनी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शेतकर्‍यांचे जीवमान उंचवावे अशी अपेक्षा आमची आहे. शेतकरी सधन व सुखी झाला पाहीजे या योजनेत जमीन सुधारणा,निविष्ठा,सुधारित शेती अवजारे, पिक संरक्षण आयुधे,बैलजोडी,बैलगाडी,पाईप लाईन संच,नवीन विहीर अनुदान मर्यादा 1लाख रुपया मध्ये विहीर दुरुस्ती करणे,इलेक्ट्रिक पंप,ओईल इंजिन,ठिबक,तुषार सिंचन , पारस बाग , शेत तळे इत्यादी तसेच आदिवासी उप योजना सन 2015 ते 16 अंतर्गत 448 लाभार्थीची निवड करण्यात आलेली होती.

लाभार्थी स्वयंपूर्ण व्हावा
सर्व लाभार्थ्यानी मंजुर 12 बाबी पैकी बैलजोडी या बाबीची मागणी केल्यास सर्व लाभार्थी यांची प्रती लाभार्थी 30 हजार रक्कम मर्यादित प्रमाणे बैलजोडी खरेदी करण्यात आलेली आहे. त्यांचे खरेदी बाबतचे अनुदान संबंधित लाभार्थ्याच्या खात्यांवर वर्ग करण्यात आलेले आहे. सदर रक्कम वजा जाता शिल्लक 20 हजार रुपयाचा रकमेची आहे.
नाप्सक स्प्रये पंप नग 1, बहुउद्देशीय काल्तीव्हेटर नग 1, एच.डी.पी.इ.पाईप नग 25 असे आहेत. सदर बाबींचा लाभार्थ्याना लाभ देऊन स्वयंम पुर्ण व्हावा हा या योजनेचा उद्देश आहे.

शेती उत्पन्नात भरघोस वाढ करा
सर्व आदिवासी उप योजना सन 2015ते 16 अंतर्गत 448 लाभार्थी निवड झालेल्या लाभार्थ्यानी आपणास मिळालेल्या साहित्याचा स्वत:च्या शेत जमिनीवर जास्तीत जास्त वापर करुन स्व उत्पन्नात भरघोस वाढ करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रस्तावना उपसभापती दिलीप गावीत यांनी केले. तर सुत्रसंचालन कृषीविस्तार अधिकारी विश्वास बनसोडे यांनी केले. तर आभार कृषी अधिकारी शिरीष कोकणी यांनी मानले. यशस्वीतेसाठी कृषी अधिकारी सामान्य एस.आर.साठे.अंकुश गावीत,कार्यालय अधिक्षक आर.बी रामोळे, पी.ए.चौधरी,आर.व्ही.महाले,आयुब गावीत आदींनी कामकाज पाहिले.