प्रवाशांचे सणासुदीत हाल ; एडीआरएम मनोज सिन्हा यांना दिले निवेदन
भुसावळ- विभागात रेल्वे प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणावर ब्लॉक घेतले जात आहेत. परिणामी रेल्वेगाड्या रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेणे बंद करून प्रवाशांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे शनिवारी एडीआरएम मनोज सिन्हा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून विकासकामांच्या नावाखाली भुसावळ विभागातील अनेक पॅसेंजर गाड्या रद्द केल्या जात आहेत. भुसावळ-मुंबई, मुंबई-भुसावळ, भुसावळ-सुरत, नागपूरकडे जाणार्या काही पॅसेंजर गाड्यांसह अनेक एक्सप्रेस गाड्या अचानक रद्द केल्या जातात. त्यामुळे सर्वसामान्यांसह अपडाऊन करणार्या प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ग्रामीण भागातील गोरगरीबांना पॅसेंजर गाड्यांमुळे सुविधा मिळते. मात्र ऐन सणासुदीच्या काळात पॅसेंजर गाड्या रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर रेल्वे प्रशासनाने विकासकामे करावी, अशी अपेक्षा शिवसेना पदाधिकार्यांनी व्यक्त केली.
यांची होती उपस्थिती
संरक्षण कक्ष तालुका प्रमुख देवेंद्र पाटील, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्राचार्य विनोद गायकवाड, महिला आघाडी जिल्हा संघटक पूनम बर्हाटे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहर प्रमुख नीलेश महाजन, बबूल बर्हाटे, सविता चव्हाण, योगेश बागूल, राकेश चौधरी, हेमंत बर्हाटे, सूरज पाटील, शेखर तडवी, विक्की चव्हाण आदी उपस्थित होते.