देशी गायी नामशेष होण्याच्या मार्गावर

0

भारतीय वंशाच्या वळूंची सक्तीने कत्तल करण्यात आली. परदेशातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर जर्सी, होल्स्टेन फ्रिजियन या घाणेरड्या प्राण्यांचे वीर्य आयात करून त्या वीर्यामार्फत देशी गायी भरवून त्यांना नासवण्यात आले. खेडोपाडी असे वीर्य पाठवण्यासाठी एसटी बसेसची मदत घेण्यात आली. खासगी पशुवैद्यक डॉक्टरांना देशी गायीला एका वेळी जर्सी प्राण्याच्या वीर्याने भरवण्यासाठी पाचशे रुपये व संकरित (नासवलेले) वासरू जन्मल्यावर एक हजार रुपये देण्यात आले. संबंधित शेतकर्‍यांनादेखील पैशाचे आमिष दाखवण्यात आले. हा सर्व पैसा परदेशी कंपन्यांचा होता. हा प्रकार अजूनदेखील सुरू आहे. सर्व बाजूंनी प्रयत्न करून भारतामधून देशी गाय नष्ट करायची यावर लक्ष केंद्रित केले गेले. दुर्दैवाने हा कट 99% यशस्वी झाला असून, आता फक्त आपल्या देशात 1 टक्के देशी गायी शिल्लक आहेत. यामुळे आपल्या राष्ट्राचे कधीही भरून न येणारे अतोनात नुकसान झाले आहे. संकरीकरण थांबले नाहीतर पुढील 5 वर्षांत शिल्लक असलेल्या देशी गायीदेखील नामशेष होतील व त्यांना फोटोमध्ये पाहण्याची वेळ येईल. बाहेरून देखावा करण्यासाठी देशी गायींचे संकरीकरण दुधाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी करत असल्याचा कांगावा करण्यात आला. पण हे सपशेल खोटे आहे. कारण संकरीकरणामुळे गायीचे दुधाचे उत्पादन वाढलेलेच नाही. पूर्वीच्या शुद्ध देशी गायी भरपूर दूध देत होत्या. त्या नामशेष केल्या गेल्या. देशी गायींचे शुद्ध बीज (वळू) नष्ट केले गेले. त्यांच्या खाद्याकडे दुर्लक्ष केले गेले. कृषी शिक्षणातून देशी गायी दूध देत नाहीत त्यामुळे त्यांची कत्तल करून जर्सी होल्स्टेन फ्रिजियन हे प्राणी पाळले पाहिजेेत, असे विद्यार्थ्यांच्या मनावर चुकीच्या पद्धतीने बिंबवले गेले.

संकरीकरणामुळे दूध विषारी व रोगकारक बनले. आजही देशाच्या दुग्ध उत्पादनात साठ टक्क्यांहून अधिक वाटा म्हशींच्या दुधाचा आहे. मग गायींचे संकरीकरण करून काय साध्य झाले? भारतीय गिर (काठेवाडी) गाय ब्राझिलमध्ये एका दिवसाला 64 लीटर दूध देते. केनियासारख्या मागास आफ्रिकन देशातील शास्त्रज्ञांनी भारतातून गिर गायी नेऊन त्यांचे शुद्ध स्वरूपात जतन करून एका गिर गायीपासून दिवसाला 56 लीटर इतके दूध उत्पादन मिळवले आहे. भारतीय गिर गायीला जगामध्येे सर्वात जास्त दूध देणारी गाय म्हणून जागतिक मान्यता मिळाली आहे. मग प्रश्‍न असा पडतो की, आपल्याला जर दुधाचे उत्पादन वाढवायचे होते, तर मग देशी गिर, लाल सिंधी, साहिवाल, कांकरेज या भरपूर दूध देणार्‍या देशी गायींचा शेतकर्‍यांमध्ये का प्रसार केला नाही? शासकीय योजना राबवून गिर गायी शेतकर्‍यांना का दिल्या नाहीत? संकरीकरण करून देशी गायी नासवण्याची काय गरज होती? आश्‍चयर्र् म्हणजे गेल्या पन्नास वर्षांत भारतातून देशी गायी अमेरिका, ब्राझिल, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नेण्यात आल्या. तेथे त्यांचे शुद्ध स्वरूपात उत्तम संगोपन करण्यात आले. भारतातूनच नेलेल्या देशी गायी हे देश आंतरराष्ट्रीय बाजारात एकाला गायीला तीन ते चार कोटी या किमतीला विकत आहेत. मूळ भारतातून नामशेष केलेली ब्राह्मण ही भारतीय देशी गायीची जात आज अमेरिकेत आहे. अमेरिका या गायीला करोडो रुपये घेऊन ऑस्ट्रेलिया, मलेशिया या देशांना विकत आहे. मलेशियाच्या राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये भारतीय देशी गायीला स्थान दिले आहे. प्रत्येक भारतीय गायीच्या जातीवर संशोधन करणार्‍या कंपन्या ब्राझिल, अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत. अमेरिकेने भारतीय गायींवर संशोधन करण्यासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च करून संशोधन प्रकल्प सुरू केला आहे. अमेरिकेमध्येे भारतीय गायीचे दूध नावाने मोठमोठ्या मॉलमधून विक्री केले जात आहे. आपल्या देशातील कृषी शास्त्रज्ञ मात्र देशी गाय आणि जर्सी प्राणी यामधील फरक व जर्सीच्या दुधाचे घातक परिणाम जाणूनबुजून धोरण ठरवणार्‍या राज्यकर्त्यांच्या लक्षात आणून देत नाहीत आणि खरे वास्तव जनतेपासून लपवून ठेवत आहेत. जर्सीचे दूध पिल्याने भारतातील मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

आज जगातील सर्वात जास्त मधुमेही रुग्ण भारतात आहेत. ज्या ज्या घरी संकरित जर्सी होल्स्टेन यांचे दूध पिले जाते तिथे हमखास मधुमेहाचे रोगी तयार झाले आहेत. अगदी चार पाच वर्षे वयाच्या लहान मुलांमध्येदेखील मधुमेह रोगाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मूळ जर्सी होल्स्टेन फ्रिजियन हे प्राणी 1.5 ते 2 टन वजनाचे असतात. त्यांच्या वासराचे वजन 22 किलो असते. देशी गायीचे वजन 500 किलो असून, वासराचे वजन 11 किलो असते. ज्यावेळेस देशी गायीचा जर्सीसोबत संकर केला जातो, तेव्हा 22 किलो वजनाचे संकरित वासरू गायीला 9 महिने पोटात वागवावे लागते. गायीला विताना प्रचंड त्रास होतो. कित्येक गायींचे विताना अंग बाहेर पडते. अनेकदा गायी मरण पावतात. संकरीकरणाचा देशी गायीच्या प्रजनन संस्थावर अतिशय वाईट परिणाम होतो. देशात सध्या दररोज लाखो देशी गायींचे संकरीकरण करून त्यांना नासवण्यात येत आहे, असा अनैसर्गिक प्रयोग होणारा जगातील एकमेव प्राणी म्हणजे भारतीय देशी गाय होय. देशी गाय भारतातून संपवण्याचे हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. हे संकरीकरण असेच चालू राहिले तर येत्या पाच वर्षांनंतर मूळ देशी गायी नामशेष होतील व जर्सीसारखे घाणेरडे प्राणी गाय म्हणून सांभाळण्याची वेळ जनतेवर येईल, म्हणून संकरीकरण तातडीने बंद होण्याची गरज आहे, तरच कायद्याचा गोरक्षणाचा मूळ उद्देश सफल होईल.

धक्कादायक बाब म्हणजे गेल्या पाच दशकांत ब्राझिल, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया या देशांनी भारतातून देशी गायी नेऊन त्यांचे शुद्ध रूपात उत्तम संवर्धन केले आहे. ब्राझिलमध्ये 60 लक्ष शुद्ध भारतीय गिर गायी आहेत, तर भारतात फक्त 3 हजार शुद्ध गिर गायी शिल्लक आहेत. ब्राझिलच्या शास्त्रज्ञांनी गिर गायीची शुद्ध रूपात उत्तम जोपासना करून दिवसाला 64 लीटर इतके दूध उत्पादन साध्य केले आहे. ब्राझिलच्या एकूण दूध उत्पादनामध्ये भारतीय गिर गायीचा 80 टक्के वाटा असून, देशाची अर्थव्यवस्था भारतीय गायींच्या आधाराने उभी केली आहे. ब्राझिल जागतिक बाजारात भारतीय गायी ब्राझिलियन कॅटल नावाने विकत आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून संकरीकरणावर तातडीने बंदी आणून भारतीय देशी गाय वाचवणे काळाची गरज आहे. नाहीतर निसर्गाचा हा अनमोल ठेवा आपण कायमस्वरूपी गमावून बसू.

कट होतोय यशस्वी
भारतामधून देशी गाय नष्ट करायची यावर लक्ष केंद्रित केले गेले. दुर्दैवाने हा कट 99% यशस्वी झाला असून, आता फक्त आपल्या देशात 1 टक्केदेशी गायी शिल्लक आहेत. यामुळे आपल्या राष्ट्राचे कधीही भरून न येणारे अतोनात नुकसान झाले आहे. संकरीकरण थांबले नाही तर पुढील 5 वर्षांत शिल्लक असलेल्या देशी गायीदेखील नामशेष होतील व त्यांना फोटोमध्ये पाहण्याची वेळ येईल.

– जयवंत हाबळे
वरिष्ठ उपसंपादक, जनशक्ति
8691929797