नंदुरबारात बापावर कर्ज झाल्याने नैराश तरुणाची आत्महत्या !

0

नंदुरबार। बापावर असलेल्या कर्जाच्या नैराश्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील आसने गावात घडली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आसने येथील रामसिंग गिरासे या शेतकऱ्यांवर बँकेचे कर्ज होते. तसेच नापिकीमुळे आर्थिक परिस्थिती खराब झाली होती, या कारणामुळे त्यांचा मुलगा गौरव रामसिंग गिरासे हा नेहमी चिंतेत राहत होता. या नैराश्यातुन त्याने राहत्या घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.