भाजप निगडी अध्यक्षांचे निवेदन
पिंपरी-चिंचवड : निगडी येथील दिवंगत महापौर मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील मुख्य रस्त्याच्या पदपथावर शेकडो भिक्षुकांनी कुटुंबासह ताबा घेतला असुन दिवसेंदिवस यांची संख्या वाढतच चालली आहे, उघड्यावरच त्यांनी संसार मांडला असुन स्वच्छतेला आणि निगडीच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे त्यामुळे तात्काळ या भिक्षुकांना हटविण्यात यावे व मानवतेच्या दृष्टिकोनातुन त्यांची दुसर्या ठिकाणी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी भाजप निगडी अध्यक्ष किशोर हातागळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
निगडी सौंदर्याला बाधा
हे देखील वाचा
निवेदनात म्हटले आहे की, यमुनानगर, प्राधिकरण निगडी सारखा स्वच्छ व सुंदर भाग असताना मुख्य रस्त्यावरच या शेकडो भिक्षुकांनी ताबा मारला आहे, उघड्यावरच संसार मांडला असुन शहरवासीयांना तेथुन जाताना शरमेने मान खाली घालावी लागत आहे. मुख्य रस्त्याच्या पदपथावर शेकडो भिक्षुकांनी कुटुंबासह ताबा घेतला असुन दिवसेंदिवस यांची संख्या वाढतच चालली आहे, उघड्यावरच त्यांनी संसार मांडला असुन स्वच्छतेला व निगडीच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे त्यामुळे तात्काळ या भिक्षुकांना हटविण्यात यावे.
मुख्य रस्त्यावर अस्वच्छता
स्वच्छ भारतच्या यादीत आपले शहर पिछाडीवर असण्याचे कारण हे भिक्षुक देखील आहे, प्रत्येक मुख्य रस्त्यावरील त्यांचा अस्वच्छ वावर हे पण प्रमुख कारण आहे त्यामुळे याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने का पाहत नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे, याची दखल घेऊन लवकरात लवकर त्यांना हटविण्यात यावे व शक्य असेल तर मानवतेच्या दृष्टीकोनातुन त्यांची दुसरीकडे तात्पुरती पर्यायी व्यवस्था करावी असे त्यात नमुद करण्यात आले आहे.