पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल, पण मोदींना सत्तेपासून दूर ठेऊ : गुलाम नबी आझाद

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही इतर पक्षांना पाठींबा देऊ, असे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. लोकसभा निकालानंतर देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास आम्ही पंतप्रधान पद सोडण्यास तयार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आघाडी सरकारमध्ये आम्हाला पंतप्रधान पद नाही मिळाले तरी चालेल, पण रालोआ सरकारला सत्तेपासून दूर ठेवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

कॉंग्रेसने आता मोदी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नवा डाव टाकला असल्याचे बोलले जात आहे. जर कॉंग्रेसच्या बाजूने सगळे मित्र पक्ष उभे राहतील तर आम्ही देशाचे नेतृत्व स्वीकारण्यास  तयार आहोत. लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला बहुमत मिळणार नसल्याने अस बोलले जात असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. 
   केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी  विरोधी पक्षांना निवडणूक जिंकण्याचा विश्वास वाटत असेल तर त्यांनी आपला पंतप्रधान घोषित कराव असे आव्हान केले होते. दरम्यान गुलाम नबी आझाद यांनी केलेल्या विधानामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या असून, येत्या २३ में  ला कुणाला बहुमत मिळेल या कडे लक्ष  लागून राहिले आहे.