राजकोट- भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. भारताने आज दुसऱ्या दिवशी ६४९ धावांवर डाव घोषित केले आहे. वेस्टइंडीज संघाने खेळाला सुरु केले असून ३३ धावांवर ४गडी बाद झाले आहे. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे वेस्टइंडीजची अवस्था खराब झाली आहे. भारताने सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात मोठी धावसंख्या उभारून कसोटीवरील पकड भक्कम करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल.