पालघरमधील साधूंच्या हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस

0

नवी दिल्ली: लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पालघर जिल्ह्यातील एका गावात दोन साधूंची जमावाने हत्या केली. याप्रकरणी आता सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नोटीस दिले असून खुलासा मागितला आहे.पालघर हत्याकांडामुळे महाराष्ट्रासह देशातील राजकारण ढवळून निघाले होते. विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला होता. दरम्यान आता सुप्रीम कोर्टाने देखील राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.