पुणे : सोमवारी पुण्याच्या रस्त्यावर बेलगाड्यांची रांग लागल्याने या बैलगाड्या आश्चर्याचा विषय ठरल्या होत्या. या दहा किंवा पंधरा बैलगाड्यानसून या बैलगाड्यांची संख्या 51 एवढी होती. या बैलगाड्या रस्त्यावर का आल्या होत्या हे असा प्रश्न सर्वांच्याच मुखातून ऐकू येत होता. या बैलगाड्या या खास लग्नासाठी निघाल्या होत्या. अलीकडे आलिशान लग्नाची नवी परंपरा सुरु होत असताना पुण्याच्या पुरंदरमध्ये पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून वर्हाड नेण्यात आले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ एक दोन नाही तर तब्बल 51 बैलगाड्यांतून हे वर्हाड लग्न कार्यालयात पोहोचले होते.
पुरंदरच्या नारायणपूरमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. नारायणपूरच्या बाजीराव बोरकरांचा मुलगा नाथसाहेब आणि शिवरीतल्या पंढरीनाथ कदमांची मुलगी स्वाती यांचा विवाहसोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.
गाड्यांनी होणारे प्रदूषण टाळण्यासाठी वर पित्याने चारचाकींऐवजी बैलगाड्यातून वर्हाड मंगल कार्यालयावर नेले. घरातल्यांसोबतच येणार्या पाहुण्यांनाही स्वतःची बैलगाडी घेऊन या, असे निमंत्रण देण्यात आले होते. विशेष म्हणजे सर्वांनीच बैलगाडीचे निमंत्रण स्वीकारत बैलगाड्या हजर केल्या. बैलांच्या अंगावर रंगबिरंगी झूल पांघरुन गळ्यात घुंगर्याच्या माळा, पायात चाळ आणि गाडीच्या चाकालाही घुंगरं लावली होती. नवरदेव, मित्रमंडळी आणि वर्हाड गाडीत बसवून लग्न सोहळ्यासाठी प्रस्थान केले. बाजारपेठेतून एकामागोमाग एक जाणार्या या 51 बैलगाड्यांची मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती.