चार जण जखमी; चाळीसगाव मालेगाव रोडवरील घटना
चाळीसगाव – चाळीसगावकडुन मालेगाव कडे प्रवासी घेवुन जाणारी ॲपे रिक्षावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने २ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता तालुक्यातील बिलाखेड शिवारातील टोलनाक्याच्या पुढे रस्त्यावर रिक्षा पलटी झाल्याने ४ प्रवासी जखमी झाले तर ६० वर्षीय महीलेचा खाजगी रुग्णालयात मृत्यु झाला आहे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहिती नुसार, चाळीसगावकडून मालेगावकडे प्रवासी घेवुन जाणाऱ्या ॲपे रिक्षा चालकाने भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन रिक्षा चालवल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा २ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता चाळीसगाव मालेगाव रोडवरील तालुक्यातील बिलाखेड शिवारात टोल नाक्याच्या पुढे रस्त्यावर पलटी झाल्याने ४ प्रवासी गंभीर झाले होते. त्यात लक्ष्मीबाई बाळु गवळी (वय-६०) रा. बळीरामपेठ शनिपेठ जळगाव या गंभीर जखमी झाल्या होत्या. रिक्षा पलटी झाल्यानंतर चालकाने लागलीच रिक्षा सरळ करुन मी तुमच्यासाठी रुग्णवाहिका आणतो व तुम्हाला खर्च देतो, असे सांगुन तेथुन पळुन गेला. त्यानंतर जखमींना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात आणुन उपचार केले व लक्ष्मीबाई गवळी यांना देवरे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. याप्रकरणी हर्षा दशरथ गवळी (वय-२१) रा.जळगाव यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला विना नंबर ॲपे रिक्षा वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास हवालदार राजेंद्र चौधरी करीत आहेत.