मुंबई । राज्य सरकारने प्लास्टिकबंदी लागू केली आहे. तरीही मुंबई महापालिकेच्या कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिक बॉटलचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामुळे या प्लास्टिक बॉटलची विल्हेवाट 21 दिवसांत लावण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहे. महापालिकेच्या कार्यालयांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र तसेच कुलर लावण्यात आले आहेत. ही जलशुद्धतेची पाहणी करण्याची सूचनाही आयुक्तांनी अधिकार्यांनी केली आहे.
पालिकेच्या सर्व सहायक आयुक्त, विभागप्रमुख तसेच कार्यालयीन सभा बैठकांमध्ये उपस्थितांना पाणी देण्यासाठी काचेचे जार, पेपर ग्लास यांचा वापर करावा, असे परिपत्रकात म्हटले आहे. तसेच कार्यालय परिसर प्लास्टिक मुक्त असल्याचे सूचना फलक लावण्यात यावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.
मुंबई महापालिकेच्या कार्यालयांना नागरिक मोठ्या प्रमाणात कामानिमित्त भेटी देतात. तसेच पालिका कार्यालयांमध्ये अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकाही होत असतात. या बैठकांमध्ये सर्रासपणे प्लास्टिक पाण्याच्या बॉटल वापरण्यात येतात. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा र्हास होत असल्याने आयुक्तांनी प्लास्टिक बॉटलची विल्हेवाट लावण्याचे आदेशच परिपत्रकाद्वारे दिले आहेत.