अनाथ, अंध-दिव्यांग व सामाजिक मागासलेल्या घटक ठरलेल्यांनी घेतला आपलेपणाचा अनुभव
व्यावसायिक संतोष बारणे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
पिंपरी : लग्न समारंभ म्हटलं की वधू-वरांसाठी मोठे आनंदाचे क्षण असले तरी दोघांच्या कुटुंबियांना एका नात्यात गुंफणारा हा ऐक आनंदाचा प्रसंग असतात. त्यामुळे रूसवे फुगवे काढत सर्वांच्या सहमतीने घरातील लग्न पार पाडले जाते. पण आपले आई-वडील असल्याने हे आनंदाचे क्षण अधिक आनंदाचे वाटतात. मात्र ज्यांना आई-वडील नाहीत, अपंग आहेत. पण या आनंदात दिनदुबळ्या, अनाथ, अंध-दिव्यांग व सामाजिक मागासलेल्या घटकाला देखील आपल्या आनंदा ऐवढाच आनंद मिळवून देण्याचे काम क्वचितच कुणीतरी करत असते. त्यातीलच ऐक नाव म्हणजे मोशीतील बारणे कुटूंब. आपल्या भावाच्या लग्नात मनसोक्तपणे वरील प्रमाणे सर्व घटकांना सहभागी करुन सामाजिकबांधिलकी जपण्याबरोबरच पर्यावरणाचाही संदेश देण्याचा एक नवा पॅटर्न तरुण बांधकाम व्यावसायीक संतोष बारणे यांनी शहराला घालून दिला आहे. या आगळ्या वेगळ्या लग्न समारंभाला भोसरीचे आमदार महेश लांडगे, बांधकाम उद्योजक संतोष बारणे, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा
समाजसेवी संस्थांना केली आर्थिक मदत
हे बांधकाम व्यावसायिक असलेल्या संतोष बारणे यांचे बंधू अतिश बारणे यांचा विवाह राजेंद्र साठे यांची मुलगी श्वेता साठे हिचाशी मोशी येथे नुकताच ‘वैशिष्ठपुर्ण’ पध्दतीने पार पडला. त्यामुळे याकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले. बारणे यांनी आपल्या या लग्नात समाजातील सर्व प्रकारच्या घटकात काम करणार्या संस्थांना भरीव स्वरुपाची अर्थिक मदत करुन त्यांच्या कामांना प्रोत्साहन देण्याचा अभिनव प्रयत्न केला आहे. यासाठी आपल्या लग्नातील अनेक खर्चाला बगल देत, अनाथ मुलांचा सांभाळ करणार्या विकास अनाथ आश्रम संस्था, राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात सामिल करणारी स्नेहवन संस्था, मोशीतील अंध-दिव्यांग व गरजू मुलांसाठी नेहमीच अग्रसेर असलेला जाणीव परिवार अशा या सर्व संस्थांच्या कार्याचा उचित गौरव करीत त्यांना बारणे परिवाराकडून संतोष बारणे यांनी लाखो रुपयाची भरिव आर्थिक मदत कली आहे.
पाहुण्यांना दिले झाडाची रोप
या मदतीमुळे या संस्थांवर अवलंबून असलेल्या शेकडो निराधार व गरजू मुलांच्या जीवनाला एक झळाळी मिळाली असून त्यांच्या या कार्याचा सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. हे असून देखील बारणे कुटूंब मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देण्यासही विसरले नाहीत. तर यापुढे जाऊन त्यांनी शहरातील पर्यावरणाचा होत असलेला र्हास पाहता लग्नसमारंभात आलेल्या हजारो पाहुण्यांना हापुस आंब्यांची रोपे देऊन पर्यावरणाचा समतोल राखण्याचा अतिशय मोलाची साद देखील घातली आहे. अशा पध्दतीने साजरे होणारा हा शहरातील पहिलाच लग्न सोहळा असल्याचे बोलले जात आहे.