बीए, बीकॉम, बीएस्सीसह अव्यावसायिक अभ्याक्रमच्या परीक्षा रद्द

0

नवी मुंबई: कोरोनामुळे विविध पदवी परीक्षा आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत राज्य सरकार विचाराधीन होते. अखेर आज बीए, बीएएसस्सी आणि बीकॉमच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत. तसेच अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार नाहीत अशी अधिकृत घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. एटीकेटी संदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल असेही जाहीर करण्यात आले आहे. मागील सर्व सत्रांमध्ये उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम सत्रातील वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन विद्यापीठाने योग्य ते सूत्र वापरुन त्यांचा निकाल जाहीर करावा. याचा अर्थ ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी तसे लेखी विद्यापीठाला द्यायचे आहे. ज्यांना परीक्षा द्यायची नाही त्यांनीही विद्यापीठाला लेखी द्यायचे आहे असेही मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून त्यांना पदवी प्रदान केली जाईल असंही सामंत यांनी स्पष्ट केले.