पुणे । महापालिकेच्या हद्दीतील रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत असलेल्या बेवारस गाड्या जप्तीची मोहीम महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हाती घेतली आहे. या कारवाईत 691 गाड्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने उचलल्या असून, त्यामध्ये दोन चाकी गाड्या 368, तीन चाकी 66, चारचाकी 250, सहाचाकी सहा गाड्या आणि सहा चाकी पेक्षा जास्त एक गाडीचा समावेश आहे. एक महिन्यात त्या सोडवून घेण्यासाठी कोणी आले नाही तर त्याचा लिलाव करण्यात येणार आहे.
शहरात 15 वर्षांहून अधिक जुन्या झालेल्या तब्बल एक लाखाहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. नियमानुसार, संबंधित वाहन मालकांनी ही वाहने स्कॅप करणे आवश्यक आहे. ही वाहने स्क्रॅप करत नाही. ती स्क्रॅप करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्याने हे मालक ही वाहने घराबाहेर अथवा रस्त्यावरच लावतात. अशी कित्येक बेवारस वाहने रस्त्यावरती गेली अनेक वर्षे पडून आहेत. या वाहनांवर कारवाई करणार असल्याचे महापालिका प्रशासन नेहमी सांगत असते परंतु ही उचलली वाहने कुठे टाकायची ही प्रशासनापुढे मोठी समस्या आहे आणि ती पूर्ण पाने सोडवण्यास प्रशासनाला यश आले नाही. तसेच वाहने उचलताना त्यासाठी लागणारी क्रेन आदी यंत्रणा देखील महापालिकेकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही.
त्यामुळे बर्याच कालावधीपासून सार्वजनिक जागांवर आणि रस्त्यांवर बंद अवस्थेत पडून असलेली ही वाहने वाहतुकीसाठी अडथळे ठरत आहेत. त्यातच या वाहनाच्या वापर दहशतवादी कारवायांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या वाहनांमुळे रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे ही वाहने काढण्याची मागणी वाहतूक पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून महापालिकेकडे वारंवार करण्यात येते. याबाबत वरवर पलिकेतर्फे ही वाहने उचलण्याची मोहीम हाती घेण्यात येते. मात्र वाहने काही उचलली जात नाही. यावेळी देखील महापौरांनी प्रशासनाला आदेश होते. त्यानंतर या कारवाईला सुरुवात करण्यात आले आहे. या कारवाईत जप्त केलेल्या गाड्या घेऊन जाण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. दंड भरून त्या गाड्या घेऊन जाता येणार आहेत.