बैलपोळा विथ लंपी….

भारत देश हा कृषिप्रधान देश हाय प्राचीन काळापासून शेती व्यवसायावर लोक आपला उदरनिर्वाह करत आहेत. भारतात प्रमुख व्यवसाय म्हणून शेतीकडे पहिले जाते.भारतात 60% च्या वर लोक शेती या प्रमुख व्यवसाय करतात. भारतात सामाजिक आर्थिक विकासात शेती या प्रमुख व्यवसाय आहे, अशा प्रमुख व्यवसाय असलेल्या भारतात शेतकऱ्याला म्हणजेच बळीराजाला प्रमुख सात असतील त्याच्या पशुधनाची. पशुधनात काय बैल बकरी म्हैस यासारखे जनावरे पशुधन म्हणून पाळले जातात. यात प्रमुख प्रशासन म्हणून बैल या प्राण्याकडे पाहिले जाते.

प्राचीन काळापासून शेतकऱ्याला शेती व्यवसायात मदत करत असलेला बैल (सर्जा ) हा शेतकऱ्याचा मित्र आहे. सर्जाराजाचा सण भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरा करतात, महाराष्ट्रात आसन बैलपोळा नावाने साजरा करतात. बैलपोळा सर्जाराजाचा वाढदिवसच, या दिवशी बैलांना सर्व कामापासून सुट्टी असते, भारतात बैलांच्या खूप जाती पाहायवास मिळतात, जसे की नंदी, खिल्लारी, नागोरी, मालवी,निमाडी, पोंवर, डोंगी, ओंगोल, जवरी,गवळव, सिंधी, राठी, गिर, वेचून, देवणी, यासारख्या खूप जाती आहेत यापैकी बऱ्याचशा जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी सारख्या राज्याच्या खांद्याला हळद व तुपाने मालिश केली जाते. त्यास खांदे मळणी म्हणतात बैलपोळ्याच्या दिवशी सकाळी नदी, तलाव, विहीर येथे आंघोळ काढून वेगवेगळे पद्धतीने पहिल्यांदा सजवून त्यांची गावातून मिरवणूक काढली जाते, व गोडाचे जेवण भरून बैलांची पूजा केली जाते.

यंदाच्या बैलपोळ्याच्या सणावर शेतकऱ्यावर नैसर्गिक संकट तसेच त्याच्या पशुधनावरती लंपी आजाराचे संकट ओढावले आहे. आर्थिक संकटामुळे बैलपोळा सण शेतकरी साजरा करू शकत नाही. जगातील क्रमवारीत भारत देश 2 नंबरचा देश आहे ज्याच्याकडे सर्वात जास्त पशुधन आहे, भारतात 281 दशलक्ष पशुधन आहे अशा या पशुधणावर लंपी या आजाराने हल्ला केला असून यात आतापर्यंत साठ हजाराच्या वर जनावरे दगावली आहेत. लंपी हा त्वचेचा रोग असून हा संसर्गजन्य आजार आहे, हा प्रामुख्याने गुरांमध्ये होतो, लंपी हा रोग पॉक्सीव्हीरीडी परिवारातील कॅप्रीपॉक्स व्हायरस आहे. लंपी आजार मच्छर, डास, उवा, यांच्या विशिष्ट प्रजाती चावल्यामुळे होतो. हा विषाणू ज्यांना आजार संक्रमित होणारा असून एकापासून दुसऱ्या जनावरास होतो. 2019 मध्ये भारतात प्रथम या आजाराची लागण झाली. त्यामुळे अनेक गुरे दगावली.

लंपी आजाराची लक्षणे खालील प्रमाणे आढळून आले

1) गुरांना ताप यणे

2) गुरांचे वजन कमी होणे

3) डोळ्यातून चिकट पदार्थ बाहेर येणे

4) तोंडातून लाळ पडणे

5) शरीरावर गाठी येणे

6) गुरांचे तब्येत खराब होणे व दगावणे

WOAH ( वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ) यांनी लंपी आजाराची लक्षणे तसेच उपाय शेतकऱ्यांना सांगितले आहे.

काळजी = 1) गुरांच्या गोठ्यात माशाडा सुधारण्याची काळजी घ्यावी व स्वच्छता राखावि

2) यांचा वडासांचा प्रतिबंधात्मक उपाय करावा

3) निरोगी गुरांना लंपी बाधित गुरांपासून दूर (वेगळे ) ठेवणे.

4) लंपी बाधीत गुरांना चरणासाठी बाहेर सोडू नये.

5 ) गाई म्हशी वेगवेगळ्या ठिकाणी बांधावे

6) गुरांचा लसीकरण करावे

लंपी आजाराने बाधित गावात तसेच गावापासून 5 किलोमीटर त्रिज्येत गावातील 4 महिने वयावरील गाय,म्हैस,बैल जनावरांना 1 ml प्रति गोट पॉक्स उत्तर काशी स्ट्रेन लस टोचाव्यात, प्रत्येक गुरांना वेगवेगळी सुई वापरावी, वेळोवेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे, लंपी बाधित गुरांचे दूध पिऊ नये. अशा पद्धतीने गावरान न जाता काळजी घ्यावी आपल्या गुरांना बरे करावे..

बैलपोळ्याच्या सणावर बळीराजास सुगीचे दिवस येवो, पशुधनावरील लंपी आजाराचे सावट लवकर दूर हो अशी देवाकडे प्रार्थना करूया,

आकाश रविंद्रनाथ भालेराव

रा. शेमळदे ता. मुक्ताईनगर

मो नं. 8806782610