नवी दिल्ली । 2024 पर्यंत भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक होणार आहे. अर्थातच येत्या 7 वर्षांत भारत सर्वाधिक लोकसंख्येचा राष्ट्र होणार आहे. यापूर्वीही संयुक्त राष्ट्रने भारत सर्वाधिक लोकसंख्येचा राष्ट्र होणार असे भाकित दर्शवले होते. मात्र, केवळ 7 वर्षांतच हे बदल होतील असे म्हणण्याची ही पहिलीच वेळ आहे. यूएनच्या अहवालानुसार, 2030 पर्यंत भारताची लोकसंख्या 150 कोटींचा पल्ला गाठणार आहे. तर, 2050 पर्यंत जगाची एकूण लोकसंख्या तब्बल 10 अब्जांपर्यंत जाणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढणार
हा अहवाल यूएनच्या आर्थिक आणि सामाजिक विभागाने सार्वजनिक केला आहे. यास ’द वर्ल्ड पॉपुलेशन प्रॉस्पेक्ट्स: द 2017 रिवीझन’ या नावाने ओळखल्या जात आहे.
आताच भारताची लोकसंख्या 134 कोटी
यूएनच्या अहवालानुसार, सध्या जगाची एकूण लोकसंख्या 7.6 अब्ज आहे. 2050 पर्यंत ती वाढून तब्बल 9.8 अब्जांवर पोहचणार आहे. 2050 पर्यंत भारतात ज्येष्ठ नागरिकांची अर्थातच 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांची संख्या दुप्पट होईल. भारत आणि चीनच्या लोकसंख्येमध्ये सध्या अवघ्या 7 कोटींचा फरक आहे. भारताची लोकसंक्या 134 कोटी तर चीनची लोकसंख्या 141 कोटी एवढी आहे. अहवालातील अंदाजानुसार, जगाच्या लोकसंख्येत दरवर्षी 8.3 कोटींची वाढ होत आहे.