झळा कायम; बंधार्यात पाणी पोहोचण्यास तीन दिवसांचा अवधी
भुसावळ: थकबाकीअभावी आवर्तन सोडण्यास विलंब करणार्या पाटबंधारे विभागाने अखेर बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पाच हजार 227 क्यूसेक्स हतनूर धरणातून आवर्तन सोडल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. असे असलेतरी धरणातील पाणी बंधार्यापर्यंत पोहोचण्यासाठी किमान तीन दिवसांचा अवधी लागणार असल्याने तो पर्यंत मात्र शहरवासीयांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
चर्चेनंतर सुटले आवर्तन
बुधवारी पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता संदेश कुलकर्णी यांच्या दालनात नगराध्यक्ष रमण भोळे, कार्यकारी अभियंता आर.एच.विचवे, भुसावळ रेल्वेचे सिनी.डीएमओ भंगाळे, मंडळ अभियंता एम.एस.तोमर (विशेष कार्य), अॅड.बोधराज चौधरी आदींच्या उपस्थितीत बैठक होवून चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष भोळे यांनी आम्ही थकबाकीदार नाही मात्र तरीही आवर्तन सोडण्यात न आल्याने दोन लाख लोकांना टंचाईचा सामना करावा लागत असल्याची व्यथा मांडली. अधिकार्यांनी ही बाब मान्य करीत आवर्तन सोडण्याचे जाहीर करण्यात आले. रेल्वे प्रशासनातर्फे देखील बाजू मांडून काही पैसे भरण्याची तयारी दर्शवण्यात आली. त्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास हतनूर धरणातून पाच हजार 227 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले. धरणातील एक गेट दोन मीटरने उघडण्यात आले असून त्यातून प्रति सेकंद 148 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.