भुसावळ शहरात शेतकर्‍याची गळफास घेवून आत्महत्या

0

भुसावळ- शहरातील हनुमान नगर भागातील रहिवासी असलेल्या 36 वर्षीय इसमाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. विनोद देविदास अहिरे (36) असे मयत ईसमाचे नाव असून ते शेतकरी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. या प्रकरणी दिनेश अरुण नेमाडे यांनी दिलेल्या खबरीनुसार बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.