वर्धा । वर्धा जिल्ह्यातील एका लग्नसोहळ्यात अगदी सिनेस्टाईल प्रकार पाहावयास मिळाला. लग्नाच्या भर मंडपातून नवरीने पळ काढला आणि सर्वत्र एकच खळबळ माजली. मात्र तिथेच उपस्थित असलेल्या एका मुलीने नवरदेवाशी लग्नास होकार दिल्याने लग्नसोहळा पार पडला. नवरा-नवरी बोहल्यावर चढण्यास अवघा काही अवधी असतानाच नवरी पळाल्याचे कळलं आणि वरासह वधूकडील मंडळींनी शोधाशोध सुरु केली. मात्र नवरी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे समोर आले.
नवरीची शोधाशोध सुरु असताना चिंतातूर नवरदेव खुर्चीत बसला होता. त्याचवेळी मंडपातील ज्योती नामक मुलगी लग्नासाठी तयार झाली आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. ज्योतीच्या होकारामुळे लग्नसोहळा पार पडला.