रायगड: डहाणूच्या समुद्रात बोट बुडाल्याची घटना घडली आहे. ही बोट मासेमारीसाठी गेलेली होती. रात्री साडेआठच्या सुमारास ही बोट बुडाली. बोटीवरील ११ खलाशांचा जीव वाचला आहे. यावेळी आजूबाजूच्या बोटीवरील मच्छिमार मदतीसाठी धावून आले.
धाकटी डहाणू येथील भानुदास गजानन तांडेल यांची भाग्यलक्ष्मी ही बोट डहाणू बंदरातून ४ ऑगस्ट रोजी मासेमारीला गेली होती. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ती बुडाली. या वेळी बोटीवर तांडेल यांच्यासह ११ खलाशी होते. आजूबाजूच्या बोटी आणि त्यावरील मच्छीमार मदतीला धावून आल्यानं जीवितहानी टळली.