राहुल गांधींच्या प्रश्नाला अमित शहांचे सडेतोड उत्तर

0

नवी दिल्ली:गलवान खोऱ्यातभारत आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला, यात 20 भारतीय सैनिक शहीद झालेत तर 40 पेक्षा अधिक चिनी सैनिक मारले गेलेत. सीमेवर तणावाचे वातावरणात असताना राजकारण देखील तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सैनिक शहीद झाल्याने सरकारवर प्रश्न उपस्थित करत सवाल उपस्थित केला आहे. या सगळ्या वादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रश्न उपस्थित करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तर दिले आहे.

A brave armyman’s father speaks and he has a very clear message for Mr. Rahul Gandhi.

At a time when the entire nation is united, Mr. Rahul Gandhi should also rise above petty politics and stand in solidarity with national interest.

गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीन सैन्य भारतीय हद्दीत घुसल्याचंही बोलले जात होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत हे वृत्त फेटाळून लावला. त्याचबरोबर चीन सैन्य भारतीय भूभागावर आले नव्हते, असा दावाही केला होता. त्यावरूनही राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले होते. या आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या एका जवानाच्या वडिलांनी यात राजकारण करू नका, असे आवाहन केले होते. तो व्हिडीओ ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिले आहे.

“एका शूर जवानांच्या पित्याने स्पष्ट शब्दात संदेश दिला आहे. आज संपूर्ण देश एकवटला आहे. अशावेळी राहुल गांधी यांनी शुल्लक राजकारणातून बाहेर यायला हवं आणि राष्ट्राच्या हितासाठी एकजुटीनं उभं राहायला हवं,” असं ट्विट करत अमित शाह यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिलं आहे.