राहुल गांधीच्या इफ्तार पार्टीत प्रणव मुखार्जीना निमंत्रण नाही

0

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी नागपुरात आरएसएसच्या कार्यालयात हजेरी लावल्याने काँग्रेस नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्ष अजूनही त्यांच्यावर नाराज दिसतो आहे. कारण राहुल गांधी यांनी दिलेल्या इफ्तार पार्टीत प्रणब मुखर्जी यांना आमंत्रणचे दिले गेले नाही. १३  जूनला काँग्रेसने इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये याचे आयोजन करण्यात ले आहे. पण यासाठी काँग्रेसचे नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना आमंत्रण देण्यात आलेले नाही.

म्हत्त्वाचे म्हणजे काँग्रेसने या पार्टीत माजी उपराष्ट्रपती हामिद अंसारी यांना देखील अजून आमंत्रण दिलेले नाही. काँग्रेसने २ वर्षानंतर इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. पण या पार्टीला प्रणब मुखर्जी यांना आमंत्रण नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसने या पार्टीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील आमंत्रण दिलेले नाही.