विराट सर्वच करणार तर इतरांची गरज काय?

0

मुंबई। चॅम्पियन स्पर्धेत विराट कोहली व माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे याच्यातील वाद समोर आला.त्यानंतर या वादावर पडदा टाकण्यासाठी व अनिल कुंबळे यांना मुदत वाढ देण्यासाठी क्रिकेट सल्लागार समितीने कोहली व कुंबळे स्वतंत्रपणे भेट घेवून वाद संपविण्याचा प्रयत्न केला होता.अनिल कुंबळे प्रशिक्षकपदी कायम राहावेत, असा सल्ला सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी दिला होता. मात्र या तिघांचा सल्ला कोहलीने अमान्य केला.आणि याचा शेवट कुंबळेच्या राजीनाम्याने झाला.यामुळे माजी कर्णधार सुनील गावसकर नाराज झाला असून जर कर्णधार व खेळाडूच्या मर्जीने प्रशिक्षक निवड करायचा असले तर क्रिकेट सल्लागार कशाला पाहिजे.असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

कुंबळे व कोहलीचा वादावर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भाष्य करित प्रश्‍न उपस्थित केला.कर्णधाराची पसंती व नापसंती इतकी महत्वाची असेल,क्रिकेट सल्लागार समितीचे काम काय?असे भाष्य करित गावसकरने विराटवर थेट लक्ष्य केले आहे. बीसबीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीत माजी क्रिकेटपूट सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे. भारतीय संघासाठी नवा प्रशिक्षकाची निवड करण्याची जबाबदारी याच समितीकडे आहे.कर्णधाराची पसंती महत्वाची असेल तर कोहलीलाच विचारावेे प्रशिक्षण कोण असेल.यामुळे इतर लोकांचा वेळ वाचले.असे म्हणून गावसकारांनी नाराजी व्यक्त केली.कर्णधार व प्रशिक्षक याच्या वादत गावसकर यांनी कुंबळेची बाजू लावून धरली आहे.या प्रकरणावर कोहलीने आपली बाजू मांडावी, असे आव्हानदेखील गावसकर यांनी केले आहे.

180 धावांनी पराभव होवूनही भारतीय संघातील खेळाडूंच्या चेहर्‍यावर दु:खाचा लवलेशही नव्हता.कोहलीने पाक संघाचे कौतुक केले. याचा राग कुंबळेला आला. मैदानावर पाकखेळाडूसोबत मजामस्ती करित होते भारतीय खेळाडू. यानंतर कुंबळे यांनी विराटसह सर्व खेळाडूंना धारेवर धरले. संघातील एकाही खेळाडूची कामगिरी अंतिम सामन्याला साजेशी झाली नाही, अशा शब्दांमध्ये कुंबळेने सर्व खेळाडूंची खरडपट्टी काढली होती.