वीज जोडणी न मिळाल्याने नुकसान भरपाई द्यावी

0

चिखली : वर्षभर वीज जोडणी न मिळाल्याने 20 लाख रुपये ही झालेली नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ईश्‍वरी इंटरप्रायजेसने महावितरणकडे केली आहे. 2017 मध्ये वीज वितरण कनेक्शन मिळावे याकरिता अर्ज केला होता. पण वर्षभर वीज जोडणी मिळाली नाही. उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या जमिनीचा वापर होऊ शकला नाही. त्या जमिनीची बाजारभावाने किंमत लक्षात घेतली तर वीस लाखाचे नुकसान झाले. जमिनीचा वापर व्हावा म्हणून कर्ज काढून शेड उभारणी केली होती. वरीष्ठ कार्यालयापर्यंत वीज कनेक्शन द्या अशी मागणी वारंवार केली. पण त्याकडे महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. या प्रकरणांतील दोषींवर क ारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.