वृक्ष लावण्यासह संवर्धनावर भर द्यावा

0
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अधिकाऱ्यांना सूचना 
मुंबई  :- वन विभागामार्फत राज्यात येत्या १ जुलै ते  ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.या मोहिमेत सहकार विभागामार्फत १२ लाख ५० हजार वृक्ष लागवड करण्यात येईल. वृक्ष लागवडीसोबतच त्यांच्या संवर्धनावर भर देण्याची सूचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी अधिका-यांना दिली.
वृक्ष लागवडीच्या निमित्ताने निसर्गाचा होणारा ऱ्हास टाळण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे सांगून सहकारमंत्री म्हणाले, तालुकास्तरीय उपनिबंधक कार्यालयापासुन तर विभागीय व राज्य कार्यालयांच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचा-यांनी मिशन मोडवर काम करावे. यावेळी जिल्हानिहाय वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आढावा घेवून वृक्ष लागवडीचे सूक्ष्म नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली. गेल्या वर्षी सहकार खात्याने या मोहिमेत सक्रीय सहभाग घेवून ९४.८३ टक्के एवढे उद्दिष्ट साध्य केले होते.