मुंबई। चॅम्पियन ट्रॉफित पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाक सोबत झाला. हा सामना भारताने एकतर्फी जिकला.असे असले तरी या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संधी देण्यात आली नाही. यावर पत्रकारांशी विराट कोहली याला विचारले असता,तो म्हणाला की, तो बर्याच काळापासून 50 षटकाचा सामना खेळलेला नाही.तसेच बुमराह व भुवनेश्वर यांनी चांगली कामगिरी केली आहे. शमीला संघात संधी न देण्यावर कोहली म्हणाला की, शमी गेल्या अनेक महिन्यांपासून 50 ओव्हरचे सामने खेळला नाही.
सराव सामन्यांमधील शमीची कामगिरी पाहून मला आनंद झाला आहे. मात्र, बुमराह आणि भुवनेश्वरने गेल्या काही मालिकांमध्ये चांगला सराव आणि कामगिरी केली आहे.शमीची क्षमता मला माहित आहे. त्यामुळे तो नेहमीच आमच्या ताफ्यात असेल. शमी असा खेळाडू आहे, जो कोणत्याही स्थिती सामना जिंकवून देऊ शकतो., असेही कोहली यावेळी म्हणाला.2015 च्या विश्वचषकानंतर मोहम्मद शमीने एकही वनडे क्रिकेट सामना खेळला नाही आणि वारंवार होणार्या दुखापतींनीही त्याला हैराण केले. गेल्या दोन वर्षांपासून दुखापतीने त्याची पाठ सोडली नाही.कोहलीच्या वक्तव्यावरुन असं दिसून येतं की, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना श्रीलंकेविरोधात खेळण्यासाठी संधी मिळू शकते आणि मोहम्मद शमीला पुन्हा एकदा विश्रांती घ्यावी लागण्याची शक्यता आहे.