नवी दिल्ली : मोदी सरकारने आपल्या ४ वर्षांच्या कार्यकाळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विविध गिफ्ट्स दिले आहेत. मात्र, सर्वात मोठे गिफ्ट हे २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी मिळणार असल्याचे दिसत आहे. केंद्रात सत्तेवर असलेले भाजप सरकार येत्या १५ ऑगस्ट २०१८ रोजी दोन मोठ्या घोषणा करु शकते.
शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवून ६२ केले जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. याचा फायदा जवळपास १ कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, मोदी सरकार करणार असलेल्या या घोषणांचा थेट परिणाम आगामी लोकसभा निवडणुकांवर होणार आहे.