शिवरायांना अभिवादन करून हल्लाबोल यात्रा

0

धुळे । राज्य सरकारचे धोरण सर्व बाबतीत कुचकामी ठरले असल्याने त्यांना जाहिरातबाजीवर कोट्यवधींची उधळण करून मॅग्नेटिक महाराष्ट्राचा देखावा करावा लागत असल्याचा आरोप सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. यावेळी सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला. उध्दव ठाकरे यांनी आतापर्यंत सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या धमक्यांचे शतक केल्याचे ते म्हणाले.

फागणे ते अमळनेर हल्लाबोल यात्रा
विधानसभेत धर्मा पाटील आत्महत्या, भूसंपादनातील गोंधळ व अनुषंगिक विषय उपस्थित करणार असल्याचेही तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. डॉ़ हेमंत देशमुख यांच्याविरूध्द दाखल गुन्ह्याच्या सखोल चौकशीतून सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले. त्यानंतर सरकारी धोरणांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फे फागणे ते अमळनेर हल्लाबोल यात्रा काढण्यात आली. शिवजयंतीनिमित्त फागणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन केले. यानंतर हल्लाबोल यात्रेस सुरवात झाली. या यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ हे सहभागी झाले होते.