जळगाव। आ आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रयेक व्यक्ती धडपड करीत आहे. पण यशस्वी होणे म्हणजे नेमकी काय करावे या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे नसते. त्यामुळे परिस्थितीशी सामना करून त्यावर सकारात्मक विचाराने कृती करणे महत्वाचे आहे. व्यवसाय आणि नोकरी हे दोन यशाचे मार्ग आहेत. या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी शिक्षणाच्या प्रवेश व्दारातून पात्रता मिळविणे गरजेचे आहे. काहीतरी मिळविण्यासाठी अगोदर द्यायला शिका. स्वताच्या विचारांवर विश्वास ठेवून कृती करणे अपेक्षित असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वत:ची नियमावली तयार करून घ्यावी. यशाची जर आपली ओळख बनवायची असेल तर आत्मीय ऊर्जाशक्तीचा वापर करा. तुमच्या आतील कौशल्याने तुम्ही ठरवलेले धेय निश्चीत करू शकतात परंतु कौशल्य विकसित करणेसाठी सराव तेवढाच महत्वाचा आहे. असे मत डॉ.विवेक काटदरे यांनी व्यक्त केले.
तुमची आवड हेच तुमच्या जीवनात सर्वोच्च स्थान
तुमची आवड हेच तुमच्या जीवनात सर्वोच्च स्थान आहे. त्यासाठी त्या दिशेन प्रवास करणे अपेक्षित आहे. मानवाने आपल्या आतील दडलेल्या उर्जाशक्तीचा पूर्णपने वापर केल्यास सामाजिक विकासात क्रांतिकारी बदल घडू शकतो. नोकरी किंवा व्यवसाय करताना तुमच्या कामावर प्रेम करा पैसा मिळणे अपेक्षितच आहे. तसेच सकारात्मक विचारला आचरणात आणून आपल्या कामात सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत संचालिका डॉ.प्रिती अगरवाल यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी महाविद्यालयातील सोई सुविधा, विद्यार्थ्यांसाठी इतर कोर्सेस व अभ्यासक्रमाची माहिती देत सर्व शिक्षकांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. तसेच प्रा.राहुल त्रिवेदी यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर गमतीशीर पद्धतीने कार्यशाळा घेतली. प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंटमध्ये एमबीएच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी स्वागतपर जुनून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित सिनिक समूह धुळे येथील व्यवस्थापकीय संचालक निरंजन बटवाल, संचालिका डॉ.प्रिती अगरवाल, विभागप्रमुख प्रा.मकरंद वाठ, डॉ.दीपक शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.गरज हि शोधाची जननी आहे. वेळे नुसार मानवाला बदल स्वीकारणे आवश्यक आहे. सामाजिक बदलानुसार त्याला जीवन जगणे गरजेचे आहे, आणि परिस्थितीचा स्विकार करायला शिका. असे मत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित निरंजन बटवाल यांनी व्यक्त केले.