वृक्ष संवर्धनावर भर ; प्रत्येक ग्रामपंचायतीला 3200 रोपांचे उद्दिष्ट
रावेर- रावेर सामाजिक वनीकरण विभागाच्या नर्सरीतून मंगळवारपासून ग्रामपंचायतींना रोपे वाटपास प्रारंभ झाला. बोहर्डे, पातोंडी गावांना पहिल्या दिवशी रोपे देण्यात आली तर प्रत्येक ग्रामपंचायतीना सुमारे तीन हजार दोनशे रोपे पुरविण्याची जबाबदारी शासनाने सामाजिक वनीकरण विभागावर सोपवली आहे.
तीन लाख जातीचे रोपे उपलब्ध
सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीत सुमारे तीन लाख चार हजार विविध जातीचे रोपे उपलब्ध आहेत. तालुक्यातील सुमारे 95 ग्रामपंचायतींना ही रोपे पुरवण्यात येणार आहे. नर्सरीमध्ये सर्व रोपे टवटवीत असून तीन महिने ते दिड वर्षापर्यंतची रोपे येथे उपलब्ध आहे. ही नर्सरी यशस्वीरीत्या जगविण्यासाठी सामाजिक वनीकरणाचे वनक्षेत्रपाल अर्षद मुलानी, वनरक्षक आयशा पिंजारी व मजूरांनी परीश्रम घेतले.
या जातीची रोपांची उपलब्धता
सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीत गुलमोहर, करंज, चिंच, आवळा, शेवगा,बाभूळ, शिसू, वड, उंबर, पडस, बेहडा, सनमोहर, बेल, सागवान आदी चौदा प्रकारचे रोपे या नर्सरीमध्ये उपलब्ध आहे. पारोळा व धरणगाव येथूनसुध्दा एक लाख 50 हजार रोपे सामाजिक वनीकरण पुरवठा करणार आहे. दरम्यानख, नर्सरीची रोपे जगविण्यासाठी सर्व सेंद्रीय खत, नदीचा गाळ, व मातीचा पुरेपुर वापर करण्यात आला आहे. एकूण 14 प्रकारच्या जातीचे रोपे आमच्या कडे उपलब्ध आहे. ही सर्व रोपे ग्रामपंचायतींना आम्ही पुरविणार असल्याचे वनक्षेत्रपाल अर्षद मुलानी यांनी सांगितले.