जळगाव। आजच्या आधुनिक युगात काही मुले आई-वडिलांना सोबत घेवून राहत नाहीत. त्यांना वृध्दाश्रमात पाठवतात. यामुळे वृध्दाश्रम ही वृध्दांची व्यथा आहे की व्यवस्था असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संघटक हभप. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी केले. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री कै. गं.भा. दगुबाई देवराम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमीत्त तालुक्यातील सावखेडा येथील मातोश्री वृध्दाश्रमात जीवनाश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झेडपी सदस्य प्रतापराव पाटील होते.
कर्णबधीर शाळेतही वह्यांचे वाटप
सावखेडा येथील मातोश्री वृध्दाश्रमातील 70 ते 80 आजी आजोबा, कर्णबधीर शाळेतील 150 विद्यार्थ्यांना तसेच बाल निरिक्षण गृहातील 140 बालके, लिलाई बालाश्रमातील 51 बालकांना जीवनाश्यक वस्तु तसेच विद्यार्थ्यांना 100 डझन वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक जाधव, बाल निरीक्षण गृह अधिक्षका सारीका मेतकर, उपअधीक्षक डिगंबर पाटील, कर्णबधीर शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर इंगळे, पाळधी युवा सेना शहरप्रमुख आबा माळी, बळीराम पाटील, भगवान पाटील, मंगल पाटील, पं.स.सदस्य तुषार महाजन, प्रविण पाटील, नंदू पाटील, धनंजय सोनवणे, दिलीप पाटील, पंकज पाटील, चंदन कळमकर, भैया पाटील, आदींसह आजी आजोबा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना सोनवणे, सुत्रसंचालन माजी जि.प.सदस्य विश्वनाथ पाटील यांनी तर आभार मुख्याध्यापक पद्माकर इंगळे, सारीक मेतकर यांनी मानले.