हतनूर धरणाचे सर्वचे सर्व दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !

भुसावळ प्रतिनिधी दि 17 हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात मध्यप्रदेश येथे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. त्यामुळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रावेर. मुक्ताईनगर. तालुक्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

 

धरणाखाली भुसावळ, यावल, चोपडा, अंमळनेर, जळगाव, जामनेर, एरंडोल, धरणगाव, या सर्व तालुक्यातील नदीकाठच्या गावांनाही सतर्क राहणे बाबत कळविण्यात आलेले आहे. पुढील काही तासात हतनूर धरणातून चार लाख क्युसेस पाणी प्रवाह सोडण्यात येणार आहे. हतनूर धरणाची धोका पातळी २१५ मीटर असून आज रोजी धरणाची पातळी २१२ मीटरवर सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व पोलीस विभागास नदीकाठच्या गावी सतर्क राहणे बाबत कळविण्यात आलेले आहे.

तसेच पोलीस विभागास विभागाकडे असलेल्या बोटी तसेच पट्टीचे पोहणारे नावाडी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक आपला मित्र पथक यांना नदीच्या गावी तत्पर राहण्याबाबत कळविण्यात आले आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मोजे खडकी मढोदे, भोकरी, पातोंडी हे तीनही गावे तापी नदी काठावर असल्याने तापी नदीला महापूर आल्याने तीनही गावांमध्ये पुराचे पाणी घुसले असून तेथील लोकांना सतर्क करण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापन यांना फोनद्वारे माहिती देऊन कळविण्यात आले आहे. तसेच तीनही गावांमध्ये योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. सदर पुरामुळे कुठल्याही गावात काही नुकसान झालेले नसून कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही.