चंदीगड- हरियाणात धुक्यामुळे ५० गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. अपघात झालेल्या गाड्यांमध्ये शाळेच्या बसचाही समावेश आहे. दिल्ली आणि हरियाणादरम्यान असणाऱ्या रोहतक-रेवारी हायवेवर हा अपघात झाला आहे. सात पैकी सहा महिला आहे.
अपघातात गाड्यांचा अक्षरक्ष: चुराडा झाला असून रस्त्यावर गाड्यांची रांग लागली होती. दुर्घेटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आले होते. अनेकजण कारमध्ये अडकले होते, त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. अपघातानंतर दोन किमी लांब गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.
हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील अनेक ठिकाणी दाट धुके पडले असून दृश्यमानता कमी झाली आहे. 500 मीटरच्या अंतरावरही स्पष्ट दिसत नाही आहे.