हिंदी-चिनी भाईभाई ..?

0

चीन-भारत हे स्वातंत्र्यानंतर मित्र झाले. भारत-चीन-रशिया जर एकत्र आले, तर अमेरिकेचा पराभव निश्‍चित होता. म्हणून अमेरिकेने भारतीय गुप्तहेर संघटनेला विकत घेतले. इंटलिजिन्स ब्युरोने खोटे अहवाल देऊन सीमावाद निर्माण केला. आयबीचे प्रमुख मुलिक हे पंडित नेहरूंचे सुरक्षा सल्लागार होते. हिंदी चिनी भाईभाईचे वातावरण त्याकाळी निर्माण झाले. म्हणूनच अमेरिकेने मुलिक यांना वापरून भारत चीनमध्ये मुलिकद्वारा संघर्ष पेटवला. राजकीय अपरिपक्वतेमुळे नेहरूंनी भारतीय सैन्याची कुठलीही तयारी नसताना युद्धात लोटले. आमचे अनेक सैनिक मारले गेले अनेक कैदी झाले. चीनने आमचा बराच भाग कब्जा केला. या विध्वंसाचे प्रमुख शिल्पकार मात्र नामानिराळे राहिले. युद्धात यश मिळाल्यावर चीनने आपले सैन्य मागे घेतले. यावरून स्पष्ट झाले की चीनला पुढे जाऊन भारताशी मैत्री करायची आहे.

1977 ला राजीव गांधींनी आणि नंतर वाजपेयींनी चीनबरोबर पुन्हा मैत्री करण्यास सुरुवात केली. सीमासंघर्ष सोडवण्यासाठी ठोस पाऊल उचलले. चीन भारत युद्ध म्हणजे दोन्ही देशांचे अगणित नुकसान आणि गोर्‍या माणसांचा फायदा. हीच अमेरिकन चाल आपण ओळखली पाहिजे. 1967 सोडले, तर चिनी सीमेवर कधी गोळीबार झाला नाही. आता मात्र डोक्लाम प्रकरणात युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्यात आली. मीडियामध्ये लोक डरकाळ्या फोडू लागले. चीनला धडा शिकवण्याची भाषा करू लागले.

पाकिस्तानला नष्ट करण्याचे धोरण सोडून चीनला अंगावर घेण्याची काय गरज आहे. तेच काम मनमोहन सिंग व आता मोदी करत होते. तेही अमेरिकेला खूश करण्यासाठी. दक्षिण चिनी सागरात भारताचे काय काम आहे? तर आता अमेरिका-जपान-भारत एकत्र चीनविरुद्ध महाकाय सैनिकी नाविक सराव करत आहे. त्यामुळे चीन आपल्याविरुद्ध पाकला आणखी मदत करत आहे. सीमेवर भानगडी निर्माण करत आहे. याचा सर्वात जास्त फायदा पाकला होत आहे. भारताने आपले हित बघावे. म्हणूनच 4 सप्टेंबरच्या ब्रिक्स शिखर ठरावावर जो निर्णय झाला त्याचे स्वागत केले पाहिजे. मोदीजी पिंगच्या संवादात दोन्ही देशांनी डोकलाम प्रकरण मागे टाकून आपापसात संबंध चांगले करण्याचा निर्णय जाहीर केला. हा भारताला एक जबरदस्त पाठिंबा आहे. ब्रिक्स म्हणजे ब्राझिल, रशिया, इंडिया, चीन, साउथ आफ्रिका. या पाच मोठ्या देशाचे गठबंधन हे जगाला अत्यंत गरजेचे आहे. त्यातूनच अमेरिकन दादागिरीला आपण तोंड देऊ शकतो. त्यात चीनने पुढाकार घेतला आहे. आता हे गठबंधन टिकवण्यासाठी, डोक्लाम प्रकरणात चीनने माघार घेतली. आपले सैन्य मागे घेतले. दोन्ही देशांनी शहाणपणा दाखवला. भावनात्मक विरोध न करता; सत्यपरिस्थितीवर निर्णय घेतला. बोलणी करून विषय संपवला व ब्रिक्स शिखर परिषद यशस्वी झाली. या परिषदेत पाचही देशांनी पहिल्यांदाच पाकविरुद्ध भारताला भक्कम पाठिंबा दिला. त्यात पाकस्थित दहशतवादी गटांची नावे जाहीर करण्यात आली. जैश-ए-महंमद, ङएढ आणि हक्कानी गट जाहीरनाम्यात सामील करण्यात आले. ही घटना पाकसाठी हा मोठा धक्काच आहे. पाक जगात एकटा पडला आहे. हा भारताचा प्रचंड विजय आहे. पाक हा दहशतवादी देश आहे हे जगाच्या नेत्यांच्या मनात ठासून घेण्यात भारत यशस्वी झाला आहे. दहशतवादाला निपटून काढण्यासाठी ब्रिक्स देश एकत्र काम करतील हेसुद्धा जाहीर झाले. 1971 च्या युद्धात अमेरिकन राष्ट्रपती निक्सन याने चीनला भारताच्या सीमेवर सैन्य जमवायला सांगितले तेव्हादेखील चीनने नाकारले होते.

चीन आता स्पष्टपणे आशिया खंडात संबंध सुधारण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी चीन आंतरराष्ट्रीय नियमांना जुमानत नव्हता. पण त्याला बदलावे लागले आहे. चीनचा आर्थिक उदय आणि भारत तसेच जगाशी व्यापारी संबंध चीनला त्यांच्या आक्रमकतेपासून दूर नेत आहे. चीन पाक संबंधामुळे धोक्यात आले आहेत. पण तो धोका स्वीकारण्याची तयारी चीनने दाखवली आहे. आता याचा फायदा घेऊन भारताने पाक-चीन संबंधावर कायमचा घणाघाती हल्ला करावा लागेल. शेवटी पाक आपला घोषित शत्रू आहे. रोज या संघर्षात आपले लोक मारले जात आहेत. पाकला ब्रिक्स शिखर परिषदेतून धडा शिकावा लागेल, अन्यथा जगाच्या नकाशावरून त्याला लुप्त व्हावे लागेल. हे सत्य भारताकडून पाकला पटवून द्यावे लागेल.

-ब्रिगेडिअर सुधीर सांवत
9987714929