हिरापूरच्या सहा बालकांना विषबाधा

0

चंद्रज्योतीच्या खाल्ल्या बिया; तळेगावात उपचार

चाळीसगाव- तालुक्यातील हिरापूर येथील सहा बालकांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाल्याने तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांनी तातडीने या बालकांवर उपचार केले. शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास खेळतांना छोटू दीपक कापसे (3), प्रदीप छोटू कापसे (5), राहुल बापू कापसे (7), पूनम बापू कापसे (6), गणेश बारकू कापसे (8), अमोल बारकू कापसे (6) या बालकांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्या. यानंतर त्यांना जुलाब व उलट्या सुरू झाल्याने त्यांना तातडीने तळेगाव आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना चाळीसगावच्या ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आले. ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी प्राथमिक उपचार केले. बालकांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ.बाविस्कर यांनी ‘दैनिक जनशक्ति’शी बोलतांना सांगितले.