मुंबई – गेल्या दहा दिवसांपासून गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून काल अखेर बाप्पाला निरोप देण्यात आला. आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्तांनी गिरगावच्या चौपाटीत भक्तिमय वातावरणात निरोप दिला. काल सुरु झालेली मिरवणूक आज तब्बल २२ तासानंतर संपली. आज सकाळी 9 वाजता गिरगाव चौपाटी येथे आरती करुन लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले.