अकोले: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील खानापूर शिवारातील एका महिलेवर बलात्कार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. महिला शेतात बकरी चारण्यासाठी गेली असता सोमनाथ गायकवाड ३७ याचा बोकड चोरण्याचा इरादा झाला. बोकड चोरत असतानाच शेळ्या चारणाऱ्या महिलेला पाहून नजर फिरल्याने त्याने या महिलेवर बलात्कार केला. याची वाच्यता होऊ नये म्हणून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेनंतर आठ दिवस आरोपीचा मागोवा घेत पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.खानापूर परिसरात एका आदिवासी मुलीवर बलात्कार करून तिची निघृणपणे हत्या केल्याची घटना रविवारी पहाटे उघड झाली होती. पीडितेची निघृणपणे हत्या करणारा कुख्यात गुन्हेगार गायकवाड यास पोलिसांनी आठ दिवस त्याचा मागोवा घेत अटक केली आहे. त्यानेच हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी पोलिसांनी सबळ पुरावे हस्तगत केले आहेत.
वासनेपोटीच त्याने निरापराध मुलीचा बळी घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गायकवाड याचा एक मित्र या घटनेत सहभागी असल्याचा संशय असून त्याचा अद्याप शोध सुरू आहे. दरम्यान यापूर्वी अटक केलेल्या फोडसेचा या घटनेशी काय संबंध आहे? याची चाचपणी पोलीस करत आहेत. या तापासात पोलीस उपाधिक्षक रोशन पंडित यांसह सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी, पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे, पोलीस हवलदार गणेश शिंदे, कैलास शिपणकर, धनंजय गुडवाल, आनंद मैड यांच्या टीमने अथक परिश्रम घेऊन अखेर आरोपीला अटक केली आहे.